‘गरजेला कर्ज घ्यावं आणि जमेल तेवढं लवकर फेडावं’ असं आपल्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये म्हटलं जातं. उसनवारी हा प्रकार एकेकाळी अपमानास्पद वाटायचा. जे काही करायचं ते आपल्या पैशांनी असा समज खूप ठाम होता. अर्थात त्या काळात सहजासहजी कर्ज मिळत पण नसायचं आणि व्याजदरसुद्धा भरपूर होते. परंतु गेली १५-२० वर्षांपासून जसजसे व्याज दर कमी होत गेले आणि बँकांचा पसारा वाढला तसे कर्ज घेणं सहज होऊ लागलं. शिवाय कुटुंबाच्या आर्थिक आराखड्यामध्ये व्याजावर व्यवहार करणं वाढू लागलं. आधी घरासाठी शक्यतो कर्ज घेतलं जात होतं. यानंतर दुचाकी- चारचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुढे शिक्षणासाठी कर्ज मिळू लागली आणि आता तर अगदी भटकंती करण्यासाठीदेखील कर्ज मिळते म्हणजेच हप्त्याने पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अतिशय महागड्या सौंदर्य उपचारांसाठी कर्ज मिळतं. यातून अनेकांनी चांगल्या प्रकारे कर्ज वापरून स्वतःची आर्थिक प्रगती साधली आहे. स्वतःचं घर उभं केलं, उच्च शिक्षण घेतलं, व्यवसाय वाढवला आणि आर्थिक ध्येय पूर्ण केले. कर्ज हे दुधारी तलवारीसारखं असतं. नीट वापरलं तर भरभराट होऊ शकते. परंतु हेच कर्ज जेव्हा डोईजड होऊ लागतं, तेव्हा त्यातून नुकसान आणि मनस्ताप याशिवाय दुसरं काही मिळत नाही.

loksatta
ही बातमी मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करावे. खालीलपैकी एक पर्याय निवडा
Continue with
Already registered?